जय भीम बोलो किधर भी चलो
हा विचार सांगता तेव्हढा संपला नाही
अनिवासी अन विदेशीयांना का असावे शिक्षणात आरक्षण ?
का विदेशी ब्राह्मीना साठी सोडावे आम्ही सत्तेचे कुराण ?
का गांधी समाधी साठी राजघाटावर असावा सरकारी फुकट भूखंड ?
का आमच्याच घरच्या भाकरीच चुकवावे आम्ही मूल्य ?
का आमच्याच बस , गाड्यांच्या
 एक दिवस निःशुल्क प्रवासाचे तुम्हाला व्हावे शल्य ?
निशुल्क फायदे , सवलती  कधी इतरांनी का घेतल्याचं नाहीत ?
का एकलव्याचा अंगठा फुकट कोणी मागितलाच नाही ?
कि बळी राजाचा आमचं राज्य
 तीन  फुकट्या पावलांनी कोणी घेतलीच नाही ?
आम्ही तर मागतो रॅलीवाय च्या संडासा जवळची टीचभर जागा
नाही तरी करतो आम्ही एका पावलावर  प्रवास उभा
कधी कापला अंगठा, आता खुशाल कापा पाय
पण हक्क आमचा भीम भेटीचा
वाटलं तर हट्ट म्हणा , फुकट म्हणा
कधीच सोडणार नाही !
कधीच सोडणार नाही !

#जनसेनानी #Jansenani  कल्याण
५ आगस्ट , २०१८ 

Comments

Popular posts from this blog